१५ ऑगस्ट २०२६ रोजी 'वंदे मातरम (Vande Mataram)' आणि 'युवा शक्ती (Yuva Shakti)'च्या १५० वर्षांचा गौरव अधोरेखित करत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.
- 'युवा शक्ती (Yuva Shakti)' ही यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम होती.
- सदर कार्यक्रमात जवळपास ५,००० पाहुण्यांनी सहभाग घेतला आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- यावेळी 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या पूर्ततेचे स्मरण करत 'युवा शक्ती'वर प्रकाश टाकण्यात आला.
- 'विकसित भारत (Viksit Bharat) @२०४७' चे स्वप्न साकारण्यात भारतातील तरुणांची भूमिका आणि त्यांच्या ऊर्जेवर विशेष भर देण्यात आला.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 'गार्ड ऑफ ऑनर' स्वीकारत राष्ट्रध्वज फडकवत देशाला संबोधित केले.
- यावेळी २१ तोफांची सलामी आणि Mi-१७ हेलिकॉप्टर्सद्वारे हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
- दिल्ली पोलिसांच्या नवी दिल्ली विभागामार्फत 'हर घर तिरंगा, घर-घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते.
- कोणत्याही अनुचित घटना रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलातर्फे (Border Security Force - BSF) १० ते १७ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण पश्चिम सीमेवर 'ऑपरेशन अलर्ट' राबविण्यात आले.
- यावेळी पोलीस, अग्निशमन दल, होम गार्ड आणि नागरी संरक्षण तसेच कारागृह सेवांमधील एकूण १,०५७ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली.
- यामध्ये उत्कृष्ट सेवेसाठी ९२ 'राष्ट्रपती पदके' आणि प्रशंसनीय सेवेसाठी ६६४ पदकांचा समावेश होता.