नुकतेच भारताने महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विक्रमी आठवे विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारताने महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात १८३/५ अशी धावसंख्या उभारून श्रीलंकेचा पराभव करत महिला आशिया चषकाचे विक्रमी आठवे विजेतेपद आपल्या नावावर कोरले आहे.
  • भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला ही विशेष बाब आहे. 
  • शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली.
  • त्यासोबतच भारतीय फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचे आव्हान मोडून काढले.
  • २०२४ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतरचा हा विजय भारतीय संघासाठी वचपा काढल्यासामान होता.

विशेष कामगिरी - एक कटाक्ष:

  • शेफालीने आक्रमक फलंदाजी करत केवळ २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ती महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी खेळाडू ठरली.
  • तिचे हे २१ वे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक होते तसेच या स्पर्धेतील तिसरे आणि सलग डावांमधील दुसरे अर्धशतक ठरले.
  • स्मृती मानधनानेही आक्रमक पवित्रा घेत ३५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
  • शेफाली आणि स्मृती यांची ही सहावी शतकी भागीदारी ठरली.